गुरुवार, ६ जून, २०१३

Asach kahisa

जगणं कसं आहे ? कळल आहे का कधी ? आपलंच आयुष्य उलगडून पाहिलं की स्वत:चा स्वत:मध्येच  इतका गुंता होतो. भूतकाळातही जायची गरज नाही. इतकी नाती, त्याबद्दल असणारी जाणीव, त्या माणसांबद्दल वाटणारी ओढ, आकर्षण, प्रेम. काही वेळा व्यक्त केलेलं खूप वेळ अव्यक्त ठेवलेलं! प्रत्येक आजूबाजूच्या व्यक्तीबद्दल काही न काही ओढ असतेच. त्याशिवाय कोणताच बंध तयार होत नाही. ती व्यक्ती मग तुमची मित्र-मैत्रिण असो, सहकारी असो किंवा तुमचे वरिष्ठ असोत.
या नात्यांचा जसा आनंद मिळतो तसंच काही वेळेला दु:खहि मिळत. नात जवळच झाल की अपेक्षा वाढतात. अस झाल की अपेक्षाभंगाच दु:ख आलच. मग काय करायच? कस जगायचं ? सगळी  कवाडं बंद करून? स्वत:शी भिंत बांधून? अस जगण म्हणजे गुदमरण  नाही का? का नाही आपण कोणाला मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत? कुठेतरी पोचण  म्हणजेच नात परिपूर्ण झाल असं थोडच आहे? किंवा कुठे  तरी पोचेल म्हणून मैत्री तोडण बरोबर आहे का?
आपण कोणाला तरी आवडतो हि भावना रोज छान रहाण्यासाठी नक्कीच उपयोगी  पडते .
म्हणून कुठे पोचायचं  नसलं तरी मोकळ व्हावं. जगण अर्थपूर्ण बनवावं स्वत:चं आणि आपल्या जवळच्या माणसांचं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा