शनिवार, ३ सप्टेंबर, २०११

वलय

    वाळूवरून पाउल हळूवार टाकत ती  चालली होती. सगळीकडेच एक प्रकारची स्तब्धता होती. मध्येच एखादा वाळूचा खडा उडत होता. तळ्याच मनी स्तब्ध होत. झाडांची सळसळ फक्त वातावरणाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. तिला सगळ गळ्यापर्यंत भरून आल होत. विचार करता करता ती काठावर कधी बसली तीच  तिलाच कळल नाही. एकटेपणाच भय एकदा गेलं ना कि मग मृत्युचीही भीती वाटत नाही. हळूच एक खडा तिने पाण्यात टाकला.
    खडा पटकन खाली गेलं. त्याच अस्तित्वच मिटून गेल. सभोवताली पाण्याची वलय उठली आणि दूर काठापर्यंत जाऊन ती हि पाण्यात परत मिसळून  गेली.
    माणसाच्या आयुष्यात लोकही असेच येतात नाही का?तिच मन म्हणत होत. येतात आणि वलयाप्रमाणे नाहीसे होतात. पण आपण मात्र खडयासारखे अस्तित्व हरवून बसतो. खडयाला वाटत असतं हि वलय सगळी आपल्याभोवतीच आहेत पण हळूहळू त्या खडयाची पाण्यातली खोली वाढत जाते आणि एकेक एकेक करत वलय विरत जातात. अपर वेदना होत असतात. सगळच काही नकोसं होत. अपेक्षाभंगाच दुख खरचच खूप वेदनादायक असतं. आणि आपण एकटे आहोत हि भावना जेंव्हा वाढत जाते तेव्हा मग जगण नकोस होत. एक कोणी तरी हव असतं अगदी आपल, घट्ट धरून ठेवण्याजोग. कुणाच्या तरी खांद्याचा आधार हवा असतो, अश्रू धाल्न्यासाठी. कुणाचा तरी हात हवा असतो आपल्याला समर्थपणे पेलण्यासाठी.
  कधीतरी या सगळ्या अवस्थांमधून ती गेली होती. वलयाना धरून ठेवायचा प्रयत्न करतानाच सगळेच दूर गेल्यावर ती हताश होत होती. सगळ्या वेदना कशा अजूनही ताज्या होत्या. टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईचा मृत्यू, त्या आधीची बालिश अजाण नसलेली ती अचानक प्रौढ झाली. घरातले सगळे संदर्भ बदलले. काळाबरोबर आणखीनच बदलत गेले. एक परकेपणाची जाणीव झाली. एक एक करत वलय दूर गेली आणि मग वलय दूर जाण्याची चढाओढच चालू झाली. सगळ्यात जवळच वलय पण दूर दूर निघून गेल. आधाराला कुणीच नाही. काहीतरी होण्याची जिद्द मावळायला लागली अशात परत एक आशेचा किरण उगवला. कुठल्याही नवीन experiment
    ला ती घाबरत होती. पण तो आला आणि तिच्या आयुष्यात बदल घडले. त्याला आपोआप सगळ काही समजायचं आणि मग तिच जगण सोप झाल. ती भराभर यशाची शिखर चढत गेली. एक आत्मविश्वास आला. तुम्ही कोणीही नसताना तू कुणी तरी आहेस हे सांगणारे कुठलेही शब्द चालतात. त्याने नेमक तेच केल. सुरुवातीला तिच्या दुखांच्या खपल्या निघायच्या आणि ती कावरीबावरी व्हायची. असह्य झाल कि खूप रडायची. भावनांचा आवेग त्याला समजायचा आणि मग तो चं पैकी त्या अश्रुना बंध घालायचा. त्यांच्या मधलं नात  कोणतं  हे तिन कधीच शोधायचा प्रयत्न नाही केला. तो कुठेही असला तरी तो नक्की कुठेतरी आहे हे तिला माहित होत. सगळ्यांनी सोबत नाकारल्यावर तो आला तिचा हात धरला आणि समर्थपणे पेलत तिला दूरवर घेऊन गेलं.जिथं तिला सापडलं जगण्याच खर मर्म.

आणि आज तिला अचानक कळल कि त्याच लग्न ठरलं. त्याला आता कोणी तरी तिच्यापासून दूर नेणार. तिने त्याला कधी च प्रियकर नव्हत मानल. त्या नजरेतून कधी च नव्हत पाहिलं पण त्याच्या इतका आधार आजपर्यंत कोणीच तिला दिला नव्हता. त्यान जगण्याची जी दिशा दाखवली ती अनोखी होती. ती स्वतच्या पायावर खंबीरपणे उभी राहिली होती. मानेनी हि ती बरीच खंबीर आता झाली होती आणि वलयांची सवय तिला अपरिचित नव्हती. हे हि वलय आपल्यापासून लांब जात आहे यामुळे भावनेच्या धबधब्यात ती आता वाहून जात नव्हती पण त्या सगळ्या आठवणीतून दोन आश्रू मात्र पटकन तिच्या डोळ्यात आले.
कोणतंच वलयखाद्याच्या हातात नसत. त्याने फक्त आपल्या मार्गाने चालायचं असतं. ती उठली आणि ऑफिसच्या दिशेने निर्धान्राने वाटचाल करू लागली

1 टिप्पणी: