सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

टप्पे

आजूबाजूच्या व्यक्ती आणि त्यांची आयुष्य. ध्येयासाठी, स्वतच्या समाधानासाठी झटणारी लोकं. यांना आयुष्यात नक्की काय हव असेल याचा ती विचार करत होती.
थोडीशी हळूवार, बरीचशी practical आणि अजून कितीतरी न उमगलेली स्वाती, बरीचशी अवखळ पण  तितकीच विचारी असलेली पल्लवी, हिला आयुष्य नक्कीच उमगल  आहे आशी वाटणारी शांत मंद तेवणारी दीपिका, स्वतःला काय हव आहे हे माहित असणारा आणि सगळ्यांशी खेळीमेळीने वागणारा पण अजूनही तितकाच  reserve असणारा संदीप, स्वतच्या छदालाच  व्यवसाय बनवून त्यात झोकून देणारा तिचा  मित्र, फक्त कामापुरताच संबंध ठेवणारे पूर्णपणे professional असलेले, स्वतःच्याच मस्तीत जगणारे तिचे सहकारी! प्रत्येक जण अजिबात मोजून मापून दिलेलं आयुष्य जगत नव्हता, चौकटीतल तर नाहीच नाही. या प्रत्येकाला जगण्याच ध्येयं माहित होत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचं जगण सोप सुटसुटीत आणि छान बनवलं होत. तिला वाटल त्यांच्याही आयुष्यात problems असतीलच ना? पण म्हणून काय ते सतत रडत आहेत? जगण्याचा समरसून आनंद घेणारी तिची जिवलग मैत्रीण! तिला मनाशीच हसू आल. किती सुंदर आयुष्य आहे तिचं !
तिला आठवले स्वतच्या जगण्याचे टप्पे - वेवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगातून आणि वेगवेगळ्या माणसांबरोबर घालवलेल आयुष्यं. तिला वाटलं आजही आपल्याला आयुष्याचा अर्थ कळलाच नाही. तिला वाटल आपण फक्त आयुष्यातले टप्पेच जपून ठेवले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा